शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

शिवाजी पुलाच्या कामास ठेकेदाराचा नकार-बँक गॅरंटी मागितली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 01:11 IST

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम ‘लाल फितीत’ अडकले असून, या उर्वरित कामाची वेळेत वर्कआॅर्डर न दिल्याने आता नव्या ठेकेदारानेही काम पूर्ण करण्यासाठी पाठ फिरवली आहे

ठळक मुद्देवेळेत वर्कआॅर्डर न दिल्याने काम करण्यास असमर्थता

तानाजी पोवार ।कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम ‘लाल फितीत’ अडकले असून, या उर्वरित कामाची वेळेत वर्कआॅर्डर न दिल्याने आता नव्या ठेकेदारानेही काम पूर्ण करण्यासाठी पाठ फिरवली आहे. पुलाचे उर्वरित सुमारे २ कोटी ७५ लाखांचे काम पूर्ण करण्यासाठी जबाबदारी घेतलेल्या गोव्यातील आसमास कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीने बँक गॅरंटीची १५ लाखांची रक्कम परत देण्याची लेखी मागणी करून काम करण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे शिवाजी पुलाच्या बांधकामाचा प्रश्न आणखी गंभीर बनला आहे.ब्रिटिशकालीन शिवाजी पुलाचे आयुर्मान संपल्याने पर्यायी पुलाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले. आतापर्यंत या पर्यायी पुलाच्या बांधकामावर सुमारे १० कोटी रुपये खर्च केला आहे. पण त्यानंतरचे काम पुरातत्त्व विभागाच्या ‘लाल फितीत’ अडकल्याने हे काम जून २०१५ पासून बंद आहे. त्यासाठी आणखी पावणेतीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. काम अर्धवट अवस्थेत रेंगाळल्याने जुन्या ठेकेदाराने कामच सोडले.उर्वरित कामासाठी खासदार धनंजय महाडिक आणि खासदार संभाजीराजे यांनी वारंवार पाठपुरावा केला. पुरातत्त्व विभागाकडून आलेल्या अडथळ्यांवर लोकसभेतून मार्ग निघाला, पण राज्यसभेचे कामकाज न चालल्याने अंतिम मंजुरी मिळाली नाही.दरम्यानच्या कालावधीत पुरातत्त्वची मंजुरी मिळेल, या अपेक्षेने हे पुलाचे उर्वरित २ कोटी ७५ लाखांचे काम पाच महिन्यांपूर्वी गोव्याच्या आसमास कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस दिले. त्यासाठी या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुमारे १५ लाख रुपयांची बँक गॅरंटी जमा केली, पण पुलाला मंजुरी मिळालीच नाही. गेले चार-पाच महिने कामाची वर्कआॅर्डर न दिल्याने बँकेचे वाढणारे व्याज न परवडणारे झाल्याने आसमास कन्स्ट्रक्शन कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रकल्प विभागास पत्र पाठवून जमा केलेली बँक गॅरंटीची रक्कम परत द्यावी, अशी मागणी करून हे उर्वरित काम पूर्ण करण्यास असमर्थता दर्शविली.‘आपत्कालीन’मधूनही नकारपर्यायी शिवाजी पुलाबाबतचा पुरातत्त्व विभागाच्या मंजुरीचा प्रश्न राज्यसभेत अडकल्याने आता हे उर्वरित काम ‘आपत्कालीन’मधून पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केला. तशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आल्या, पण हे ‘आपत्कालिन’ योजनेतील काम आपल्या अखत्यारीत येत नसल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रकल्प विभागास कळविल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग